Wednesday, May 1, 2013

बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा बळी


- खल्याळ गव्हाणच्या शेतकर्‍याचा मृत्यू देऊळगावराजा। दि. ३0 (तालुकाप्रतिनिधी) रणरणत्या उन्हामुळे तापमानात दिवसेंदिवस सातत्याने होणार्‍या वाढीमुळे जीवाची लाहीलाही होत असून, उष्माघातामुळे एका तीस वर्षीय तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. घटना देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळगव्हाण येथे सोमवारी सायंकाळी घडली. याबाबतची माहिती अशी की, गणेश शेनफडराव आदबने (वय ३0) वर्ष हे त्यांचे काका कडूबा आदबने यांच्यासोबत खल्याळ गव्हाण येथून जाफ्राबादला दुपारी १२ वाजता मोटारसायकलने गेले होते. कामआटोपल्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान परत गावी पोहोचले. उन्हाच्यातडाख्यामुळे शरीराची अंगार होत असल्याने गणोश आबदने यांनी थंड पाण्याने आंघोळ केली. मात्र, त्यानंतरही अस्वस्थपणा वाढू लागल्याने घरातच चक्कर येवून ते जमिनीवर पडले. त्यांच्या पत्नीने गावातील डॉक्टरांनातातडीने बोलावले असता, त्यांनी तपासून मृत घोषित केले. मंगळवारी खल्याळ गव्हाण येथे गणेश आबदने यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, भाऊ, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा आहे. via Buldhana

No comments:

Post a Comment